Saturday, 14 July 2012

अष्टविनायक पदयात्रेने आम्हास काय दिले......

अष्टविनायक  पदयात्रेने आम्हास काय दिले ?.
                          १) मानसिक   समाधान
                          २) आत्मिक बळ 
                          ३) मानवी स्वभावाचे असामान्य दर्शन
                          ४) जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन .
                          ५) शारीरिक क्षमता चाचणी
                          ६) सामाजिक सन्मान

आम्ही कूठे कमी पडलो!
                           १) एकमेका मधील एकात्मतेचा अभाव
                            २)पौष्टिक आहाराची उणीव
                            ३)वेळ आणि अंतराचे बंधन जास्त झाले.
                            ४) अधिक सराव हवा होता


 पाऊले चालती पंढरीची वाट ही ओळ  बरेचदा  ऐकली असेल. ही पावले चालणारच म्हणून त्याकडे दुर्लक्षही केलं असेल. पण पंढरीची असो अथवा इतर कुठलीही वाट चालणारी आपली पावले,निसर्गाने निर्माण केलेली अभियांत्रिकीची केवढी कमाल आहे, ह्याची आपणास कल्पना नसेल. शरीरात असलेल्या एकूण हाडापैकी १/४ हाडे पायात असतात. २०० स्नायू रज्जू ४० स्नायू व लक्षावधी स्नायू तंतू ह्यात असतात. शरीराच्या कुठल्याही भागात नसेल इतकं रक्त वाहिन्याचं जाळं पायात असतं. एकूण सात हाडांच्या समूहातल टाचेचं हाड सगळ्यात मोठ हाड. पोस्टमन ,फिरते विक्रेते एका बाजूला व गाडीशिवाय न फिरणारे एक बाजूला, ह्या दरम्यानची शहरी माणसंआपल्या ६० वर्षाच्या जीवनात ६५ हजार मैल अंतर चालून गेलेली असतात (१लाख ४हजार किमी) ६५-७० किलो  वजनाची व्यक्ती जेंव्हा १ मैल किवां१.६ किमी अंतर चालून  जाते तेंव्हा तेंव्हा त्याच्या पावलांनी १३२ टन वजन हलविण्याच काम केलेले असते.
  शरीर वेध   (निरंजन घाटे )

No comments:

Post a Comment