२-३-९५ गुरुवार
सर्व तयारी करून बाहेर पडायला उशीर झाला होता. मंदिराची किल्ली देण्यास श्री. शिंदे ह्यांचे कडे गेलो. चहाचा आग्रह झाला. इतर मंडळी जमा झाली होती. गाववेशी पर्यंत सोडायला मंडळी आली होती. आता पारगाव ;शिगवे; नागापूर; रांजणी मार्गे नारायणगाव गाठ्वायाचे होते. एकूण ३२ किमी. अंतर होते. इप्सित जवळजवळ येत होते. वाटेत नास्ता झाला पारगावला १२.३० ला पोहचलो. येथे घोडनदी व मीना नदीचा संगम आहे. नदीवर बांध आहे. स्नान आटोपले. गणेश वस्ती आली, इथे श्री.करंडे ह्यांनी शेजाऱ्या कडून गरम भाकऱ्या करवून घेतल्या व आम्हास जेवू घातले. रांजणगावापासून सौ.सुनीताचे पायावर थोडी सूज आली होती, दोन्ही गुडघे दुखत होते त्यामुळे गती कमी झाली होती. उठबसकरताना त्रास होत होता पण एकदा उभे राहील की चालता येत होतं! नारायणगाव पर्यंत जाणे जरुरीचे होते कारण तेथे बऱ्यापैकी हॉटेल मिळणार होते. सूर्यास्त झाल्यावर प्रवास बन्द हा नियम आज मोडला. गावात लाईट नव्हते. धनगरी कुत्र्यांचा त्रास वाढला. एस. टी. डेपो जवळ नंदनवन हॉटेलमध्ये रूम घेतली. संडास ,बाथरूम कॉमन व गरम पाण्याचा अभाव. हॉटेल नंदनवन सारखे भासले नाही. पहाटे थोडी थंडी जाणवली. रात्री इतके थकलो होतो की जेवण पण केले नाही. आमचे शरीर म्हणजे चालणारे यंत्र अशी अवस्था झाली होती. उद्या जिद्दीने शेवटची चढाई करायची होती. अंतर कमी होतं व मानसिक तणाव कमी झाला होता.
३-३-९५ शुक्रवार
नारायणगाव --ओझर हे अंतर फक्त १२ किमी आहे. सकाळी उशिरा निघालो बाहेर टपरीत चहा घेतला. आमचा हॉटेलचा अनुभव ऐकून तो टपरीवाला म्हणाला" नुसते नावाचे नंदनवन", मालक अजिबात लक्ष घालत नाही. नोकर शिरजोर झाले आहेत.
रस्ता डांबरी होता दोन्ही बाजूस घनदाट नव्हे पण तुरळक झाडी होती. बागायती जमीन म्हणून हवा पण गार होती. आर्वी ह्या सॅटेलाइट केंद्राचे अॅनटेना चारी बाजूस दिसत होते. हळूहळू ओझर जवळ आले. कुकडी नदीचे पाणी व मंदिराचा कळस दिसू लागला पण पूर्ण वळसा घेवून मंदिरात पोहचण्यास १०-३० झाले. गरम पाणी, राहण्याची सोय झाली. शुचिर्भूत होऊन विघ्नेशाचे दर्शन घेतले.
सौ.सुनीताच्या पायावरील सूज वाढली होती. मंदिरातून येताना एक आयुर्वेदिक औषधाचे दुकान दिसले होते. ह्या सुजेवर जर दुख:दबाव लेप लावला तर ? सुनीताला तर झोप लागली होती. बाहेर पडलो लेप घेवून आलो आणि तिच्या पायाला, गुडघ्याला व घोट्याला लेप लावला. क्रेप बान्डेज बांधलं. औषधाची गोळी दिली. जेवणाची काही सोय होते का हे बघण्यास बाहेर पडलो. जेवण नाही पण मिठाई अन फळे मिळाली . थोडी विश्रांती घेतली.३-३० चे सुमारास पुन्हा एक वार दर्शन केले आणि कालव्याचे बाजूने लेण्याद्रीला जाण्यास निघालो आतापावेतो जवळजवळ ५०० किमी. अंतर पार झाले होते शेवटचे काही किमी. बाकी होते. तेच अंतर फार आहे असे वाटत होते. म्हणतात ना शिजेपर्यंत धीर धरवतो पण निवेपर्यंत नाही. आमचीही गत तशी झाली होती. सभोवार द्राक्षाचे मळे होते. हिरवीगार वनश्री होती. वाटेत १०वी इयत्ते तील काही मुली भेटल्या. त्याचे समवेत गप्पा मारीत श्रीमती शकुंतलाबाई जाधव ह्यांच्या १५ एकरांच्या द्राक्ष मळ्यावर पोहचलो. दृष्ट लागावा इतका तो छान होता. त्यांचा चहाचा आग्रह झाला. पण द्राक्षांचा मोह सोडवला नाही. थॉमसन सीडलेस ,काळी साहेबी हे दोन प्रकार चाखले. हातात एक एक किलोचा घड ठेवला व "जाता जाता खा म्हणजे रस्ता पण लवकर संपेल" असे म्हणाल्या!
हळूहळू सूर्यास्ताची वेळ आली.संध्या रंगात शिवनेरी व लेण्याद्री ह्या दोन्ही गडांना सोनेरी मुलामा चढला. गडावरील अवशेष दिसू लागले पण लेण्याद्री पायथा अजून ३ किमी. दूर होता. उठबस करीत शेवटची १०० मी .चढण पूर्ण करून सौ सुनिता थांबली. माझे सामान तिचे जवळ देवून मी विश्वतांच्या ऑफिस मध्ये गेलो. आमचा वृतांत ऐकून मंडळी मंत्रमुग्ध झाली. सगळी सोय उत्तम होईल ह्याची हमी दिली; चहा दिला व सामान वाहून नेण्यास एक माणूस बरोबर दिला. जवळच्या हॉटेल मध्ये मुंबईहून आलेल्या यात्रेकरूंचे जेवण होत होते. त्यात आमची वर्णी लागली. ८-३० वाजता चारीठाव सुग्रास भोजन मिळाले. आमचे ध्येय शिखर तर आम्ही गाठले होत! पण साध्य नव्हत झालं! त्यासाठी सकाळ पर्यंत वाट पहावी लागणार होती. इतक्यात सौ.सुनीताने एक पाटी दाखविली त्यावर लिहिले होते "समय से पहिले और तकदीरसे ज्यादा कुछ नाही मिलेगा ". तो जणू आम्हांला संदेश वाटला .खोलीवर आलो व झोपी गेलो .
४-३-९५ शनिवार
सकाळी ४ वा.जाग आली. मुंबईकर पुढच्या प्रवासाला निघणार होते. गरम पाण्यासाठी भट्टी पेटली होती. त्याचा आवाज शांतता भंग करीत होता. आम्हांला घाई नव्हती. ७ वा उठलो, तयारी केली. गरमगरम कांदे पोहे ,चहा तयार होता. आस्वाद घेतला आणि लेण्याद्रीच्या पायऱ्या चढण्यास सुरवात केली. ८-१५ सुमारास वर पोहचलो.
गिरिजात्मजाचे दर्शन झाले, लोटांगण घातले, जमिनीवर लोळू लागलो. डोळ्यात अश्रूंची दाटी झाली. अन् मन शांत झाले. अथर्वशीर्ष म्हटले, आरती केली ,ॐकर जप केला. यात्रा पूर्ण केल्याचा आनंद आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर झळकू लागला. जिद्दीने यात्रा पूर्ण केली म्हणून सौ. सुनीताचे अभिनंदन केले. संत तुकोबाची वाणी आठवली "ह्याचसाठी केला अट्टाहास........
श्री चरणी एकवार वंदन करून पायऱ्या उतरू लागलो. ११ वा .जुन्नरला जाणारी गाडी आली. तेथून कल्याण व नंतर दुपारी ५-३० ला डोंबिवलीला पोहचलो. ग्रामदेवतेचे दर्शन करून घरी पोहचलो. चि .समीर व चि.सौ सुषमा आनंदित झाले. सुनीताचा ताबा सुषमाने घेतला व पायाच्या दुखण्यावर उपचार सुरु झाले!
सर्वत्र कौतुक झाले ,मनाला उभारी आली ..................
.श्री चरणी अर्पण ..
सर्व तयारी करून बाहेर पडायला उशीर झाला होता. मंदिराची किल्ली देण्यास श्री. शिंदे ह्यांचे कडे गेलो. चहाचा आग्रह झाला. इतर मंडळी जमा झाली होती. गाववेशी पर्यंत सोडायला मंडळी आली होती. आता पारगाव ;शिगवे; नागापूर; रांजणी मार्गे नारायणगाव गाठ्वायाचे होते. एकूण ३२ किमी. अंतर होते. इप्सित जवळजवळ येत होते. वाटेत नास्ता झाला पारगावला १२.३० ला पोहचलो. येथे घोडनदी व मीना नदीचा संगम आहे. नदीवर बांध आहे. स्नान आटोपले. गणेश वस्ती आली, इथे श्री.करंडे ह्यांनी शेजाऱ्या कडून गरम भाकऱ्या करवून घेतल्या व आम्हास जेवू घातले. रांजणगावापासून सौ.सुनीताचे पायावर थोडी सूज आली होती, दोन्ही गुडघे दुखत होते त्यामुळे गती कमी झाली होती. उठबसकरताना त्रास होत होता पण एकदा उभे राहील की चालता येत होतं! नारायणगाव पर्यंत जाणे जरुरीचे होते कारण तेथे बऱ्यापैकी हॉटेल मिळणार होते. सूर्यास्त झाल्यावर प्रवास बन्द हा नियम आज मोडला. गावात लाईट नव्हते. धनगरी कुत्र्यांचा त्रास वाढला. एस. टी. डेपो जवळ नंदनवन हॉटेलमध्ये रूम घेतली. संडास ,बाथरूम कॉमन व गरम पाण्याचा अभाव. हॉटेल नंदनवन सारखे भासले नाही. पहाटे थोडी थंडी जाणवली. रात्री इतके थकलो होतो की जेवण पण केले नाही. आमचे शरीर म्हणजे चालणारे यंत्र अशी अवस्था झाली होती. उद्या जिद्दीने शेवटची चढाई करायची होती. अंतर कमी होतं व मानसिक तणाव कमी झाला होता.
३-३-९५ शुक्रवार
नारायणगाव --ओझर हे अंतर फक्त १२ किमी आहे. सकाळी उशिरा निघालो बाहेर टपरीत चहा घेतला. आमचा हॉटेलचा अनुभव ऐकून तो टपरीवाला म्हणाला" नुसते नावाचे नंदनवन", मालक अजिबात लक्ष घालत नाही. नोकर शिरजोर झाले आहेत.
रस्ता डांबरी होता दोन्ही बाजूस घनदाट नव्हे पण तुरळक झाडी होती. बागायती जमीन म्हणून हवा पण गार होती. आर्वी ह्या सॅटेलाइट केंद्राचे अॅनटेना चारी बाजूस दिसत होते. हळूहळू ओझर जवळ आले. कुकडी नदीचे पाणी व मंदिराचा कळस दिसू लागला पण पूर्ण वळसा घेवून मंदिरात पोहचण्यास १०-३० झाले. गरम पाणी, राहण्याची सोय झाली. शुचिर्भूत होऊन विघ्नेशाचे दर्शन घेतले.

हळूहळू सूर्यास्ताची वेळ आली.संध्या रंगात शिवनेरी व लेण्याद्री ह्या दोन्ही गडांना सोनेरी मुलामा चढला. गडावरील अवशेष दिसू लागले पण लेण्याद्री पायथा अजून ३ किमी. दूर होता. उठबस करीत शेवटची १०० मी .चढण पूर्ण करून सौ सुनिता थांबली. माझे सामान तिचे जवळ देवून मी विश्वतांच्या ऑफिस मध्ये गेलो. आमचा वृतांत ऐकून मंडळी मंत्रमुग्ध झाली. सगळी सोय उत्तम होईल ह्याची हमी दिली; चहा दिला व सामान वाहून नेण्यास एक माणूस बरोबर दिला. जवळच्या हॉटेल मध्ये मुंबईहून आलेल्या यात्रेकरूंचे जेवण होत होते. त्यात आमची वर्णी लागली. ८-३० वाजता चारीठाव सुग्रास भोजन मिळाले. आमचे ध्येय शिखर तर आम्ही गाठले होत! पण साध्य नव्हत झालं! त्यासाठी सकाळ पर्यंत वाट पहावी लागणार होती. इतक्यात सौ.सुनीताने एक पाटी दाखविली त्यावर लिहिले होते "समय से पहिले और तकदीरसे ज्यादा कुछ नाही मिलेगा ". तो जणू आम्हांला संदेश वाटला .खोलीवर आलो व झोपी गेलो .
४-३-९५ शनिवार
सकाळी ४ वा.जाग आली. मुंबईकर पुढच्या प्रवासाला निघणार होते. गरम पाण्यासाठी भट्टी पेटली होती. त्याचा आवाज शांतता भंग करीत होता. आम्हांला घाई नव्हती. ७ वा उठलो, तयारी केली. गरमगरम कांदे पोहे ,चहा तयार होता. आस्वाद घेतला आणि लेण्याद्रीच्या पायऱ्या चढण्यास सुरवात केली. ८-१५ सुमारास वर पोहचलो.

श्री चरणी एकवार वंदन करून पायऱ्या उतरू लागलो. ११ वा .जुन्नरला जाणारी गाडी आली. तेथून कल्याण व नंतर दुपारी ५-३० ला डोंबिवलीला पोहचलो. ग्रामदेवतेचे दर्शन करून घरी पोहचलो. चि .समीर व चि.सौ सुषमा आनंदित झाले. सुनीताचा ताबा सुषमाने घेतला व पायाच्या दुखण्यावर उपचार सुरु झाले!
सर्वत्र कौतुक झाले ,मनाला उभारी आली ..................
.श्री चरणी अर्पण ..
No comments:
Post a Comment